Like & Share This page

Thursday, 26 January 2017

२६ जानेवारी म्हणजे काय ?

२६ जानेवारी म्हणजे काय ?
==================
२६ जानेवारी पासून भारतात संविधान लागू करण्यात आले. भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्षे ११ महिने १७ दिवस सतत सखोल अभ्यास करून भारतीय संविधानाची लिहले. संविधान लिहितांना डॉ. बाबासाहेबांनी आपल्या स्वतःच्या तब्येतीची सुद्धा काळजी केली नाही.
डॉ. बाबासाहेबांनी जगातील सर्व प्रगत राष्ट्रांच्या घटनांचा अभ्यास करून भारताची राज्यघटना बनविली. त्या घटनेप्रमाणे २६ जानेवारी १९५० ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रयींवर आधारलेले लोकशाही राज्य म्हणून भारत हे राष्ट्र जगाच्या पाठीवर उभे राहिले.

सर्व देशातील लोकांचा समान दर्जा असला पाहिजे आणि स्वतः ची सर्वांगीण प्रगती घडवून आणण्यासाठी त्यांना समान संधी मिळाली पाहिजे, यासाठी बाबासाहेबांनी कलमे तयार केली. अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा व्हावा, म्हणून घटनेत एक कलम घालणे त्यांनी सभासदांना पटवून दिले. मागासलेल्या वर्गांना, विशेषतः अस्पृश्य व वन्य जाती यांना व स्रियांना घटनात्मक हक्क मिळणे हे जरूरी आहे आणि त्याबद्दलची देखील कलमे त्यांनी लिहून काढली. हजारो वर्षे दलित जातींचे शेकडो जीवनमरणांचे प्रश्न जे होते त्यांना देशाच्या राज्यघटनेत स्थान मिळवून देण्याचे अजरामर कार्य बाबासाहेबांनी केले.

भारताची राज्यघटना इतर देशातील राज्यघटनेपेक्षा आकाराने मोठी असूनही फार कमी काळात ती तयार करण्यात आली आहे.
१) अमेरिकेच्या घटनेला( ४ ) महिने लागले .
२) कॅनडा च्या घटनेला( २ ) वर्षे ५ महिने लागले .
३ ) ओस्ट्रेलियेच्याघटनेला (९ )वर्षे लागले .
४ ) दक्षिण आफ्रिकेच्या घटनेला (१ )वर्ष लागले.

भारताची राज्यघटना २ वर्षे ११ महिने १७ दिवसात लिहिल्या गेली. तिच्यामध्ये ३९५ कलमे, ७ परिशिष्टे आहेत त्याचप्रमाणे घटनेच्या कामकाजासाठी ११ सत्रे झाली. १४१ बैठका झाल्या. ७६३५ दुरुस्त्या सुचविल्या. त्यापैकी २४७६ मंजूर केल्या गेल्या. ११४ दिवस घटनेवर चर्चा चालली.१६५ दिवस कामकाज चालले. त्यासाठी ६३ लाख ९६ हजार ७२९ रुपये इतका खर्च झाला. घटनेचे प्रथम प्रकाशन १९५२ साली झाले. तिच्या १००० प्रती छापण्यात आल्या होत्या. मुळ प्रती इंग्रजीत आहेत इतर १४ भाषेत त्यांचे भाषांतर केले आहे. त्यावर ४४२ सदस्यांच्या सह्या असून ३१ व्या क्रमांकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भीमराव आंबेडकर अशी मराठी सही आहे.

२६ जानेवारी १९५० पासून भारत देश प्रजासत्ताक झाला. म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिला. आणि मताच्या आधारेच "प्रजेची सत्ता निर्माण केली." स्वतंत्र पूर्वी भारतात "राजा" हा राणीच्या पोटातून जन्म घेत असे. परंतु प्रजासत्ताक दिनापासून गणराज्य हे मताच्या पेटीतून जन्म घेते...
एवढे मोठे परिवर्तन भारतरत्न, विश्वविभूषण, भारतीय संविधानाचे शिल्पकार, समस्त भारताचे उद्धारक थोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणले.

२६ जानेवारी संविधान दिन चिरायू होवो.

Wednesday, 7 September 2016

एक फकीर और बादशाह मैत्री

एक फकीर बहुत दिनों तक बादशाह के साथ रहा
बादशाह का बहुत प्रेम उस फकीर पर हो गया। प्रेम
भी इतना कि बादशाह रात को भी उसे अपने कमरे में
सुलाता।

कोई भी काम होता, दोनों साथ-साथ ही
करते।

एक दिन दोनों शिकार खेलने गए और रास्ता भटक
गए। भूखे-प्यासे एक पेड़ के नीचे पहुंचे। पेड़ पर एक
ही फल लगा था।

बादशाह ने घोड़े पर चढ़कर फल को
अपने हाथ से तोड़ा। बादशाह ने फल के छह टुकड़े
किए और अपनी आदत के मुताबिक पहला टुकड़ा
फकीर को दिया।

फकीर ने टुकड़ा खाया और बोला,
'बहुत स्वादिष्ट! ऎसा फल कभी नहीं खाया। एक
टुकड़ा और दे दें। दूसरा टुकड़ा भी फकीर को मिल
गया।

फकीर ने एक टुकड़ा और बादशाह से मांग
लिया। इसी तरह फकीर ने पांच टुकड़े मांग कर खा
लिए।

जब फकीर ने आखिरी टुकड़ा मांगा, तो बादशाह ने
कहा, 'यह सीमा से बाहर है। आखिर मैं भी तो भूखा
हूं।

मेरा तुम पर प्रेम है, पर तुम मुझसे प्रेम नहीं
करते।' और सम्राट ने फल का टुकड़ा मुंह में रख
लिया।

मुंह में रखते ही राजा ने उसे थूक दिया, क्योंकि वह
कड़वा था।
राजा बोला,
'तुम पागल तो नहीं, इतना कड़वा फल कैसे खा गए?

उस फकीर का उत्तर था,
'जिन हाथों से बहुत मीठे फल खाने को मिले, एक
कड़वे फल की शिकायत कैसे करूं?

सब टुकड़े इसलिए
लेता गया ताकि आपको पता न चले।

दोस्तों जँहा मित्रता हो वँहा संदेह न हो, आओ
कुछ ऐसे रिश्ते रचे...

कुछ हमसे सीखें , कुछ हमे
सिखाएं.
किस्मत की एक आदत है कि
वो पलटती जरुर है
और जब पलटती है,
तब सब कुछ पलटकर रख देती है।

इसलिये अच्छे दिनों मे अहंकार
न करो और

खराब समय में थोड़ा सब्र करो

Wednesday, 31 August 2016

अर्ध्या भाकरीचं कर्ज....

अर्ध्या भाकरीचं कर्ज....

बायको सतत आईवर आरोप करत होती..........

आणि

नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहन्यास सांगत होता...

पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती

ती  जोरजोरात ओरडून सांगत होती

"मी अंगठी टेबलवरच ठेवली होती
आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..
अंगठी असो वा नसो ती आईनेच उचललीये"

गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली..
त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..

तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं..

पत्नीला ती चापट सहन झाली नाही.ती घर सोडून चालली

आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला....

कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का??

तेव्हा पति ने उत्तर दिले

त्या उत्तराला ऐकून
दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले

पति ने पत्नी ला सांगितले..

"जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले

आई अजुबाजूच्या परिसरात झाड़ू मारुन थोड़े पैसे आनायची ज्यात एक वेळेचं
पोट भरायचं.

आई एका ताटात भाकर वाढायची

आणि

रिकाम्या डब्याला झाकुन् ठेवायचि
आणि म्हणायची

माझ्या भाकरी या डब्यात आहेत बाळा तू खा.

मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो

आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं.

आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं

आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकिचा झालो

पण हे कसं विसरु की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं,

ती आई या स्तिथिला अशा अंगठी साठी भुकेलि असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही..

तू तर तिन महिन्यापासूनच माझ्या सोबत आहे.

मी तर आईच्या तपश्चर्यला 25 वर्षापासून बघितलय.😔

हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रु आले.

ति समजूच् शकत नव्हती की मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेड़तोय की
ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज....

Tuesday, 30 August 2016

आज ई-मेल चा बर्थ डे

आज "ईमेल" चा वाढदिवस

📧📧📧📧📧📧📧📧📧
जन्म▶३० आँगस्ट१९८२

आज-काल ई-मेल पत्ता किंवा खातं असणं हा आपल्या बायोडेटाचा अविभाज्य भाग झालाय. त्याशिवाय तुम्हाला फेसबुकवर अकाऊंट सुरू करता येत नाही की गूगलचा बहुचर्चित अँड्राईड फोनही वापरण्यापूर्वी तुमच्याकडे जीमेल असणं गरजेचं आहे. या ईमेलचा शोध कसा आणि कुणी लावला याविषयी आपल्याला काही देणं-घेणं नसतं. पण आपल्यासाठी अभिमानाची बाब अशी की ईमेलचा शोध एका भारतीयाने लावलाय. त्याहीपेक्षा मुंबईकरांसाठी कॉलर ताठ करण्याचं कारण म्हणजे या भारतीयाचा जन्म मुंबईत झाला.
 
तसंही हल्लीच्या तरूणाईचं बऱ्यापैकी कम्युनिकेशन व्हॉट्स अप किंवा एसएमएसवर होत असलं तरी ई-मेलची गरज संपलेली नाही, किंवा भविष्यातही संपेल असं वाटत नाही. या ईमेलच्या जन्माला आज 32 वर्षे पूर्ण झाली. म्हणजेच ईमेल या कॉम्प्युटर प्रोग्रामचा आज 32 वा वाढदिवस आहे.

आज प्रत्येकजण आपापल्या सोईप्रमाणे आणि आवडीप्रमाणे वेगवेगळ्या सोईप्रमाणे ईमेल वापरतो. म्हणजे कुणाचा पत्ता जीमेलचा असतो तर कुणाचा याहूमेलचा.. तर कुणाचा आऊटलूक किंवा हॉटमेल... ईमेल सेवा पुरवणाऱ्या बहुतेक कंपन्या अमेरिकी असल्या तरी सर्वात आधी ईमेलचा शोध एका भारतीयाने लावलाय, याचा आपल्याला नक्कीच अभिमान असायला हवा.

नागरिकत्व आणि शिक्षणाने अमेरिकी असलेल्या पण भारतीय वंशाच्या व्ही ए शिवा अय्यादुराई या मुलाने वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ईमेल या प्रोग्रामची निर्मिती केली. त्यावेळी त्यांने आपल्या शोधाचा कॉपीराईटही घेतला होता. त्यावेळी कॉम्प्युटर सॉफ्टवेअरसाठी पेटंटची व्यवस्थाच आस्तित्वात नसल्याने फक्त कॉपीराईट हक्कांची नोंदणी करावी लागे.

1978 मध्ये व्ही ए शिव अय्यादुराई याने बनवलेल्या कॉमप्युटर प्रोग्रामला 'ईमेल' असं नाव दिलं आणि संपर्क यंत्रणेतील एका क्रांतीचं बीजारोपण झालं.

व्ही ए शिवा अय्यादुराई याने 1978 मध्ये जरी ईमेलचा प्रोग्राम तयार केला असला तरी ईमेलचा प्रवर्तक किंवा जन्मदाता म्हणून त्याला त्याचं श्रेय मिळण्यासाठी आणखी चार वर्षांचा अवधी जावा लागला. 30 ऑगस्ट 1982 रोजी अमेरिकी प्रशासनाने शिवा अय्यादुराई यानेच ईमेलचा शोध लावल्याचं जाहीर केलं. कारण 30 ऑगस्ट 1982 रोजी म्हणजे आजपासून 32 वर्षांपूर्वी त्याच्या नावावर ईमेलचं संशोधन अधिकृत रित्या जमा झालं म्हणून आज ईमेलचा वाढदिवस जगभरात साजरा होतोय.

थोडक्यात काय तर ईमेल सारख्या क्रांतिकारी संपर्क व्यवस्थेची सुरूवात ही काही बिग बजेट प्रकल्पातून झालेली नाही. किंवा पेन्टागॉन, मिलिट्री, अर्पानेट, एमआयटी यांच्यासारख्या संशोधनाची गंगोत्री समजल्या जाणाऱ्या ठिकाणी लाखो-कोट्यवधी रूपये खर्चूनही झालेली नाही. त्याउलट ई-मेल सारख्या संपर्क व्यवस्थेचा प्रोग्राम हा अतिशय जटील आणि खर्चिक बाब अशीच या संशोधनाची गंगोत्री असलेल्या संस्थाचं मत होतं.

मुंबईत जन्मलेल्या शिवा अय्यादुराई यांच्या कुटुंबाने ते फक्त सात वर्षाचे असताना मुंबईतून अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि एक भारतीय एक मुंबईकर अमेरिकी झाला.. 2 डिसेंबर 1963 रोजी मुंबईत जन्मलेले व्ही ए अय्यादुराई आज पन्नास वर्षांचे आहेत.

वयाच्या चौदाव्या वर्षी अय्यादुराई यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातील कोरान्ट इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सच्या समर स्पेशल अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यांना कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकायचं होतं, म्हणून त्यांनी या इ्न्स्टिट्यूटची निवड केली. त्यानंतर त्यांनी न्यू जर्सीच्या लिविंगस्टन हायस्कूलमधून ग्रॅज्युएशन केलं. पदवीचं शिक्षण करत असतानाच अय्यादुराई यांनी न्यू जर्सीच्या यूनिवर्सिटी ऑफ मेडिसीन आणि डेन्टीस्ट्रीमध्येही काही काळ संशोधन केलं. ते तिथे रिसर्च फेलो होते.

याच न्यू जर्सीच्या यूनिवर्सिटी ऑफ मेडिसीन आणि डेन्टीस्ट्रीमध्ये असताना शिवा अय्यादुराई यांच्या चिकाटी आणि कॉम्युटर शास्त्र शिकण्याच्या वेडाने प्रभावित होऊन कॉम्प्युटर लॅबोरेटरी नेटवर्कचे संचालक डॉ. लेस्ली मिशेलसन यांनी तत्कालीन कागदी पत्रव्यवहाराला पर्यायी असा कॉम्प्युटर प्रोग्राम बनवण्याचं आव्हान दिलं.

त्यानुसार त्यांनी आंतर कार्यालयीन पत्रव्यवहाराचा बारकाईने अभ्यास केला. त्यातील आवकृजावक यंत्रणेचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर इनबॉक्स, आऊटबॉक्स, ड्राफ्ट, कार्बन कॉपी, फोल्डर, अॅड्रेस बुक, अटॅचमेंटसाठी वापरायच्या पेपरक्लिप्स याचा इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीममध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी तब्बल 50 हजार लाईन्सचा प्रोग्राम कोड तयार केला. हा प्रोग्राम कोड म्हणजेच आज आपण लीलया वापरत असलेला ईमेल आहे.

Saturday, 16 July 2016

तुझ्या वाचुन करमेना....


तुझ्या वाचुन करमेना
 
मला बाकी काही नको,
फक्त एकदा मला मिठीत घेऊन जा...!
मला सोडुन जात आहेस,
तुझ्यासाठी माझ्या आठवणी घेऊन जा...!!

तुझा कोमल हात,
माझ्या ह्र्दयावर ठेवुन...!
हे मनातले वादळ,
तेवढं शांत करुन जा...!!

अंधारात जगणे,
शिकता येईल मला...!
या पेटलेल्या भावनांना,
तेवढं विझवुन जा...!!

श्वासांचा स्पर्श होऊ दे,
अशी थोडी जवळ ये...!
तुझ्यातल्या सुगंधाला,
माझ्या श्वासात ठेवुन जा...!!

आयुष्यभरासाठी,
अश्रु देऊन...!
तुझ्यासाठी माझं सगळं,
सुख घेऊन जा...!!

एकदा माझे डोके,
तुझ्या मांडीवर घे...!
तुझ्याच हाताने माझे,
तेवढे डोळे बंद करून जा...!!

तु माझी नाहीस,
मी हे समजुन जग सोडुन जातो...!
मला इतर कुठेही मरण नको,
फक्त एकदा मला मिठीत घेऊन जा...!

fb.com/funnyfinternet

तुझ्याविना.....



तुझ्याविना


तुझ्याविना आज सगळ काही उन वाटतं
आहेत भवताली माणसे तरीही सुन सुन वाटतंय
आज आपल्या नात्याबद्दल थोड़ लिहावस वाटल
ढासाळताय मन माझ तरीही खोल शिरावस वाटल 



नोळखी होतिस तू माझ्यासाठी , ओळख तूच वाढवलिस
भेटिच्या ओढीपायी भेट हि तूच घडवलिस
पहिल्या भेटीचा सहवास कमालच करुन गेला
मैत्री करावी की प्रेम प्रश्नच उभारूंन गेला



तुला भेटण्याची माझी ओढ़ वाढतच गेली
जणू नव्या आयुष्याला माझ्या सुरवातच झाली
मैत्री की प्रेम तुझी द्विधा मनःस्थिति असायची
गोंधळलेल्या तुझ्या ‪#‎_कोमल‬ चेहऱ्यावरची ती लकेर स्पष्ट दिसायची

तू जरा सोबत असलिस की खुप काही मिळवल्यासारख वाटायच
नात हे आपल जणू एका बंध गाठित असायच
तिच गाठ आता सैल झाल्याचे भासते
नाते हे आपले विखुरताना दिसते

नविन लोकांमध्ये तू हरवून गेली आहेस
हळू हळू मला तू आता विसरून गेली आहेस
विखुरलेल्या नात्याकडे बघून तुझे वचनबद्ध शब्द आठवतात
("विसरणार नाही रे मी कधीच ‪#‎_पिल्लू‬ तुला , निविन प्रेम भेटल तर कोण विसरत का जुने प्रेम")
अभावनिक शब्द आठवून कंठ दाटुन येतात

अजूनही तू दिलेल्या सगळ्या ‪#‎_भेटवस्तू‬ न्ह्याळत बसतो
जर ‪#‎_दूर_जायचच_होत_तर_जवळ_आलती_कश्याला‬ हाच प्रश्न त्याला विचारत असतो
‪#‎_बर्थडे‬ ला दिलेला मी ‪#‎_ड्रेस‬ ही आता कूजत चाललाय
जनु नात्यातील दुरावा आपल्या दाखवायला लागलाय

Sunday, 26 June 2016

26 जुन 1874 रोजी जन्मलेले एक महानायक श्री राजर्षी शाहू महाराज (यशवंतराव जयसिंगराव घाटगे)

26 जुन 1874 रोजी जन्मलेले एक महानायक 

श्री राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर,


जातीभेदाविरुद्ध लढा:

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. त्यांनी अस्पृश्यांना (त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या) राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकर्‍या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.

इतर कार्ये:

शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली.

कलेला आश्रयः

राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.

स्वातंत्रलढ्यातील योगदान :

महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.

पारंपारिक जातीभेदाला विरोधः

शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करुन महाराजाना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रुंचे सारे प्रयत्न विफल ठरले.

कार्य दृष्टीक्षेप :

Birth Date - 26 June 1874
Birth Place - Kagal (Kolhapur)
Name - Yashwantrao Jaisingrav Ghatge (यशवंतराव जयसिंगराव घाटगे)
Death - 6 May 1922 (Mumbai)
* कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले.
* 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
* 1891- श्रीमंत लक्ष्मीबाईसाहेब यांच्याशी विवाह झाला
महाराजांचे शिक्षण - *1985 ते 1894 या काळात शैक्षणिक कार्य पूर्ण केले
*1894 सर फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड येथे शिक्षण घेतले
*1898 पर्यंत राजकोट येथे Principal McNoton यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले.
* 2 एप्रिल 1894 रोजी राज्याभिषेक समारंभ झाला.
*1894 - राजे झालेनंतर लगेचंच त्यांनी बहुजन समाजातून तलाठ्याच्या नेमणुका करण्याचा अध्यादेश काढला
व वेठबिगाराची पद्धत बंद केली.
* 1895 साली मोतीबाग तालीम सुरु केली. शाहू महाराजांना कुस्ती हा खेळ आवडत असे. याच वर्षी शाहूपुरी गुळाची व्यापार पेठ सुरु केली.
* 27 मार्च 1895 - पुणे येथील फर्गुसन महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले.
* 1887 - आळते महार स्कूल ची स्थापना केली, दुष्काळ पिडीत शेतकऱ्यांना कर्ज दिले.
* 1899 - वेदोक्त प्रकरण याच वर्षी घडले. तेंव्हापासून ब्राम्हणांच्या मक्तेदारीस शह देण्यासाठी आणि त्यांच्याकडून बहुजनांची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी बहुजन उद्धाराचे कार्य हाती घेतले. वेदोक्त प्रकरणात ब्राम्हणांचे समर्थन केले.
* 1901 साली मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग' या बोर्डिंग ची स्थापना कोल्हापुरात केली. याच वर्षी
नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना केली. तसेच गोवध बंदी कायदा केला.
* 20 जुलै 1902 रोजी संस्थानामध्ये नोकरी मध्ये 50% आरक्षण देण्याचा आदेश काढला.
* 9 नोव्हेंबर 1906 रोजी 'किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना कोल्हापूर येथे केली. तसेच शाहू मिल तथा 'शाहू स्पिनिंग अंण्ड विव्हिंग मिल' ची सुरुवात केली.
* 1907 सहकारी तत्वावर कापड गिरणी सुरु केली. अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी ' मिस क्लार्क बोर्डिंग हाउस ची' स्थापना केली.
* 1908 बॉंबस्फोट घडवून महाराजांना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न समाजकंटकांकडून केला गेला.
* 1910 जहागीरदारांचे अधिकार कमी केले
* 11 जानेवारी 1911 साली
कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अध्यक्ष म्हणून परशुराम घोसटवाडकर तर प्रमुख म्हणून भास्करराव जाधव हे काम पाहत. याच वर्षी विद्यार्थ्यांना 15% नादारी देण्याची घोषणा केली.
-शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याची योजना व गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याची योजना सुरु केली.
-कोल्हापुरात राधानगरी तालुक्यात भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले.
-सत्यशोधक समाजाचे अधिवेशन पुणे येथे भरवले
* 1912 - खासबाग मैदान या कुस्ती मैदानाची सुरुवात कोल्हापूर येथे केली. (याला 2012 साली 100 वर्षे पूर्ण झाली).
- सहकारी कायदा केला व सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले.
-सत्यशोधक समाजाचे अधिवेशन नाशिक येथे भरवले
*1913 गाव तिथे शाळा असावी असा अध्यादेश काढला. पाटील शाळांची सुरुवात केली.
-कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुरु केली.
* 1916 साली संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले
-बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी 'डेक्कन रयत शिक्षण संस्थे' ची स्थापना निपाणी या ठिकाणी केली.
-आर्य समाजाची तत्त्वे याच वर्षी स्वीकारली.
* 1917 विधवांच्या पुनर्विवाहास कायद्याने मान्यता दिली
- 25- जुलै पासून संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.
* 1918 आंतरजातीय विवाहास कायद्याने मान्यता दिली
- कुलकर्णी व महार वतने रद्द केली.
- जमिनी रयतवारीने कसण्यास दिल्या
- आर्य समाजाची शाखा कोल्हापुरात सुरु करून राजाराम कॉलेज या संस्थेकडे चालवण्यास दिले.
- गुन्हे गारी जमातीच्या लोकांची पोलीस हजेरी बंद केली.
- तलाठी शाळा सुरु केल्या.
* 1919 - स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यायांविरुद्ध कठोर कायदा केला.
- एप्रिल 1919 - कानपूर - "अखिल भारत वर्षीय कुर्मी क्षत्रिय महासभा" या संस्थेच्या 13 व्या
अधिवेशनात त्यांच्या अतुल्य कार्याबद्दल "राजर्षी" पदवी बहाल करण्यात आली.
- शाळेत अस्पृश्यता पाळण्यास मनाई करणारा कायदा केला.
* 1920 - घटस्फोटाचा कायदा करण्यात आला
- देवदाशी प्रथा कायद्याने बंद करण्यात आली
- हुबळी - "ब्राम्हणेतर सामाजिक परिषद" चे अध्यक्षपद भूषवले
- पूजाअर्चा शिकाऊ उमेदवाराकडून करावी असा आदेश काढला
* 6 मे 1922 रोजी मुंबई येथे निधन.