Like & Share This page

Wednesday 7 September 2016

एक फकीर और बादशाह मैत्री

एक फकीर बहुत दिनों तक बादशाह के साथ रहा
बादशाह का बहुत प्रेम उस फकीर पर हो गया। प्रेम
भी इतना कि बादशाह रात को भी उसे अपने कमरे में
सुलाता।

कोई भी काम होता, दोनों साथ-साथ ही
करते।

एक दिन दोनों शिकार खेलने गए और रास्ता भटक
गए। भूखे-प्यासे एक पेड़ के नीचे पहुंचे। पेड़ पर एक
ही फल लगा था।

बादशाह ने घोड़े पर चढ़कर फल को
अपने हाथ से तोड़ा। बादशाह ने फल के छह टुकड़े
किए और अपनी आदत के मुताबिक पहला टुकड़ा
फकीर को दिया।

फकीर ने टुकड़ा खाया और बोला,
'बहुत स्वादिष्ट! ऎसा फल कभी नहीं खाया। एक
टुकड़ा और दे दें। दूसरा टुकड़ा भी फकीर को मिल
गया।

फकीर ने एक टुकड़ा और बादशाह से मांग
लिया। इसी तरह फकीर ने पांच टुकड़े मांग कर खा
लिए।

जब फकीर ने आखिरी टुकड़ा मांगा, तो बादशाह ने
कहा, 'यह सीमा से बाहर है। आखिर मैं भी तो भूखा
हूं।

मेरा तुम पर प्रेम है, पर तुम मुझसे प्रेम नहीं
करते।' और सम्राट ने फल का टुकड़ा मुंह में रख
लिया।

मुंह में रखते ही राजा ने उसे थूक दिया, क्योंकि वह
कड़वा था।
राजा बोला,
'तुम पागल तो नहीं, इतना कड़वा फल कैसे खा गए?

उस फकीर का उत्तर था,
'जिन हाथों से बहुत मीठे फल खाने को मिले, एक
कड़वे फल की शिकायत कैसे करूं?

सब टुकड़े इसलिए
लेता गया ताकि आपको पता न चले।

दोस्तों जँहा मित्रता हो वँहा संदेह न हो, आओ
कुछ ऐसे रिश्ते रचे...

कुछ हमसे सीखें , कुछ हमे
सिखाएं.
किस्मत की एक आदत है कि
वो पलटती जरुर है
और जब पलटती है,
तब सब कुछ पलटकर रख देती है।

इसलिये अच्छे दिनों मे अहंकार
न करो और

खराब समय में थोड़ा सब्र करो

Wednesday 31 August 2016

अर्ध्या भाकरीचं कर्ज....

अर्ध्या भाकरीचं कर्ज....

बायको सतत आईवर आरोप करत होती..........

आणि

नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहन्यास सांगत होता...

पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती

ती  जोरजोरात ओरडून सांगत होती

"मी अंगठी टेबलवरच ठेवली होती
आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..
अंगठी असो वा नसो ती आईनेच उचललीये"

गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली..
त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..

तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं..

पत्नीला ती चापट सहन झाली नाही.ती घर सोडून चालली

आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला....

कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का??

तेव्हा पति ने उत्तर दिले

त्या उत्तराला ऐकून
दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले

पति ने पत्नी ला सांगितले..

"जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले

आई अजुबाजूच्या परिसरात झाड़ू मारुन थोड़े पैसे आनायची ज्यात एक वेळेचं
पोट भरायचं.

आई एका ताटात भाकर वाढायची

आणि

रिकाम्या डब्याला झाकुन् ठेवायचि
आणि म्हणायची

माझ्या भाकरी या डब्यात आहेत बाळा तू खा.

मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो

आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं.

आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं

आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकिचा झालो

पण हे कसं विसरु की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं,

ती आई या स्तिथिला अशा अंगठी साठी भुकेलि असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही..

तू तर तिन महिन्यापासूनच माझ्या सोबत आहे.

मी तर आईच्या तपश्चर्यला 25 वर्षापासून बघितलय.😔

हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रु आले.

ति समजूच् शकत नव्हती की मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेड़तोय की
ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज....

Tuesday 30 August 2016

आज ई-मेल चा बर्थ डे

आज "ईमेल" चा वाढदिवस

📧📧📧📧📧📧📧📧📧
जन्म▶३० आँगस्ट१९८२

आज-काल ई-मेल पत्ता किंवा खातं असणं हा आपल्या बायोडेटाचा अविभाज्य भाग झालाय. त्याशिवाय तुम्हाला फेसबुकवर अकाऊंट सुरू करता येत नाही की गूगलचा बहुचर्चित अँड्राईड फोनही वापरण्यापूर्वी तुमच्याकडे जीमेल असणं गरजेचं आहे. या ईमेलचा शोध कसा आणि कुणी लावला याविषयी आपल्याला काही देणं-घेणं नसतं. पण आपल्यासाठी अभिमानाची बाब अशी की ईमेलचा शोध एका भारतीयाने लावलाय. त्याहीपेक्षा मुंबईकरांसाठी कॉलर ताठ करण्याचं कारण म्हणजे या भारतीयाचा जन्म मुंबईत झाला.
 
तसंही हल्लीच्या तरूणाईचं बऱ्यापैकी कम्युनिकेशन व्हॉट्स अप किंवा एसएमएसवर होत असलं तरी ई-मेलची गरज संपलेली नाही, किंवा भविष्यातही संपेल असं वाटत नाही. या ईमेलच्या जन्माला आज 32 वर्षे पूर्ण झाली. म्हणजेच ईमेल या कॉम्प्युटर प्रोग्रामचा आज 32 वा वाढदिवस आहे.

आज प्रत्येकजण आपापल्या सोईप्रमाणे आणि आवडीप्रमाणे वेगवेगळ्या सोईप्रमाणे ईमेल वापरतो. म्हणजे कुणाचा पत्ता जीमेलचा असतो तर कुणाचा याहूमेलचा.. तर कुणाचा आऊटलूक किंवा हॉटमेल... ईमेल सेवा पुरवणाऱ्या बहुतेक कंपन्या अमेरिकी असल्या तरी सर्वात आधी ईमेलचा शोध एका भारतीयाने लावलाय, याचा आपल्याला नक्कीच अभिमान असायला हवा.

नागरिकत्व आणि शिक्षणाने अमेरिकी असलेल्या पण भारतीय वंशाच्या व्ही ए शिवा अय्यादुराई या मुलाने वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ईमेल या प्रोग्रामची निर्मिती केली. त्यावेळी त्यांने आपल्या शोधाचा कॉपीराईटही घेतला होता. त्यावेळी कॉम्प्युटर सॉफ्टवेअरसाठी पेटंटची व्यवस्थाच आस्तित्वात नसल्याने फक्त कॉपीराईट हक्कांची नोंदणी करावी लागे.

1978 मध्ये व्ही ए शिव अय्यादुराई याने बनवलेल्या कॉमप्युटर प्रोग्रामला 'ईमेल' असं नाव दिलं आणि संपर्क यंत्रणेतील एका क्रांतीचं बीजारोपण झालं.

व्ही ए शिवा अय्यादुराई याने 1978 मध्ये जरी ईमेलचा प्रोग्राम तयार केला असला तरी ईमेलचा प्रवर्तक किंवा जन्मदाता म्हणून त्याला त्याचं श्रेय मिळण्यासाठी आणखी चार वर्षांचा अवधी जावा लागला. 30 ऑगस्ट 1982 रोजी अमेरिकी प्रशासनाने शिवा अय्यादुराई यानेच ईमेलचा शोध लावल्याचं जाहीर केलं. कारण 30 ऑगस्ट 1982 रोजी म्हणजे आजपासून 32 वर्षांपूर्वी त्याच्या नावावर ईमेलचं संशोधन अधिकृत रित्या जमा झालं म्हणून आज ईमेलचा वाढदिवस जगभरात साजरा होतोय.

थोडक्यात काय तर ईमेल सारख्या क्रांतिकारी संपर्क व्यवस्थेची सुरूवात ही काही बिग बजेट प्रकल्पातून झालेली नाही. किंवा पेन्टागॉन, मिलिट्री, अर्पानेट, एमआयटी यांच्यासारख्या संशोधनाची गंगोत्री समजल्या जाणाऱ्या ठिकाणी लाखो-कोट्यवधी रूपये खर्चूनही झालेली नाही. त्याउलट ई-मेल सारख्या संपर्क व्यवस्थेचा प्रोग्राम हा अतिशय जटील आणि खर्चिक बाब अशीच या संशोधनाची गंगोत्री असलेल्या संस्थाचं मत होतं.

मुंबईत जन्मलेल्या शिवा अय्यादुराई यांच्या कुटुंबाने ते फक्त सात वर्षाचे असताना मुंबईतून अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि एक भारतीय एक मुंबईकर अमेरिकी झाला.. 2 डिसेंबर 1963 रोजी मुंबईत जन्मलेले व्ही ए अय्यादुराई आज पन्नास वर्षांचे आहेत.

वयाच्या चौदाव्या वर्षी अय्यादुराई यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातील कोरान्ट इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सच्या समर स्पेशल अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यांना कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकायचं होतं, म्हणून त्यांनी या इ्न्स्टिट्यूटची निवड केली. त्यानंतर त्यांनी न्यू जर्सीच्या लिविंगस्टन हायस्कूलमधून ग्रॅज्युएशन केलं. पदवीचं शिक्षण करत असतानाच अय्यादुराई यांनी न्यू जर्सीच्या यूनिवर्सिटी ऑफ मेडिसीन आणि डेन्टीस्ट्रीमध्येही काही काळ संशोधन केलं. ते तिथे रिसर्च फेलो होते.

याच न्यू जर्सीच्या यूनिवर्सिटी ऑफ मेडिसीन आणि डेन्टीस्ट्रीमध्ये असताना शिवा अय्यादुराई यांच्या चिकाटी आणि कॉम्युटर शास्त्र शिकण्याच्या वेडाने प्रभावित होऊन कॉम्प्युटर लॅबोरेटरी नेटवर्कचे संचालक डॉ. लेस्ली मिशेलसन यांनी तत्कालीन कागदी पत्रव्यवहाराला पर्यायी असा कॉम्प्युटर प्रोग्राम बनवण्याचं आव्हान दिलं.

त्यानुसार त्यांनी आंतर कार्यालयीन पत्रव्यवहाराचा बारकाईने अभ्यास केला. त्यातील आवकृजावक यंत्रणेचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर इनबॉक्स, आऊटबॉक्स, ड्राफ्ट, कार्बन कॉपी, फोल्डर, अॅड्रेस बुक, अटॅचमेंटसाठी वापरायच्या पेपरक्लिप्स याचा इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीममध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी तब्बल 50 हजार लाईन्सचा प्रोग्राम कोड तयार केला. हा प्रोग्राम कोड म्हणजेच आज आपण लीलया वापरत असलेला ईमेल आहे.

Saturday 16 July 2016

तुझ्या वाचुन करमेना....


तुझ्या वाचुन करमेना
 
मला बाकी काही नको,
फक्त एकदा मला मिठीत घेऊन जा...!
मला सोडुन जात आहेस,
तुझ्यासाठी माझ्या आठवणी घेऊन जा...!!

तुझा कोमल हात,
माझ्या ह्र्दयावर ठेवुन...!
हे मनातले वादळ,
तेवढं शांत करुन जा...!!

अंधारात जगणे,
शिकता येईल मला...!
या पेटलेल्या भावनांना,
तेवढं विझवुन जा...!!

श्वासांचा स्पर्श होऊ दे,
अशी थोडी जवळ ये...!
तुझ्यातल्या सुगंधाला,
माझ्या श्वासात ठेवुन जा...!!

आयुष्यभरासाठी,
अश्रु देऊन...!
तुझ्यासाठी माझं सगळं,
सुख घेऊन जा...!!

एकदा माझे डोके,
तुझ्या मांडीवर घे...!
तुझ्याच हाताने माझे,
तेवढे डोळे बंद करून जा...!!

तु माझी नाहीस,
मी हे समजुन जग सोडुन जातो...!
मला इतर कुठेही मरण नको,
फक्त एकदा मला मिठीत घेऊन जा...!

fb.com/funnyfinternet

तुझ्याविना.....



तुझ्याविना


तुझ्याविना आज सगळ काही उन वाटतं
आहेत भवताली माणसे तरीही सुन सुन वाटतंय
आज आपल्या नात्याबद्दल थोड़ लिहावस वाटल
ढासाळताय मन माझ तरीही खोल शिरावस वाटल 



नोळखी होतिस तू माझ्यासाठी , ओळख तूच वाढवलिस
भेटिच्या ओढीपायी भेट हि तूच घडवलिस
पहिल्या भेटीचा सहवास कमालच करुन गेला
मैत्री करावी की प्रेम प्रश्नच उभारूंन गेला



तुला भेटण्याची माझी ओढ़ वाढतच गेली
जणू नव्या आयुष्याला माझ्या सुरवातच झाली
मैत्री की प्रेम तुझी द्विधा मनःस्थिति असायची
गोंधळलेल्या तुझ्या ‪#‎_कोमल‬ चेहऱ्यावरची ती लकेर स्पष्ट दिसायची

तू जरा सोबत असलिस की खुप काही मिळवल्यासारख वाटायच
नात हे आपल जणू एका बंध गाठित असायच
तिच गाठ आता सैल झाल्याचे भासते
नाते हे आपले विखुरताना दिसते

नविन लोकांमध्ये तू हरवून गेली आहेस
हळू हळू मला तू आता विसरून गेली आहेस
विखुरलेल्या नात्याकडे बघून तुझे वचनबद्ध शब्द आठवतात
("विसरणार नाही रे मी कधीच ‪#‎_पिल्लू‬ तुला , निविन प्रेम भेटल तर कोण विसरत का जुने प्रेम")
अभावनिक शब्द आठवून कंठ दाटुन येतात

अजूनही तू दिलेल्या सगळ्या ‪#‎_भेटवस्तू‬ न्ह्याळत बसतो
जर ‪#‎_दूर_जायचच_होत_तर_जवळ_आलती_कश्याला‬ हाच प्रश्न त्याला विचारत असतो
‪#‎_बर्थडे‬ ला दिलेला मी ‪#‎_ड्रेस‬ ही आता कूजत चाललाय
जनु नात्यातील दुरावा आपल्या दाखवायला लागलाय

Sunday 26 June 2016

26 जुन 1874 रोजी जन्मलेले एक महानायक श्री राजर्षी शाहू महाराज (यशवंतराव जयसिंगराव घाटगे)

26 जुन 1874 रोजी जन्मलेले एक महानायक 

श्री राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर,


जातीभेदाविरुद्ध लढा:

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. त्यांनी अस्पृश्यांना (त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या) राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकर्‍या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले.

इतर कार्ये:

शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली.

कलेला आश्रयः

राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.

स्वातंत्रलढ्यातील योगदान :

महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली.

पारंपारिक जातीभेदाला विरोधः

शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करुन महाराजाना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रुंचे सारे प्रयत्न विफल ठरले.

कार्य दृष्टीक्षेप :

Birth Date - 26 June 1874
Birth Place - Kagal (Kolhapur)
Name - Yashwantrao Jaisingrav Ghatge (यशवंतराव जयसिंगराव घाटगे)
Death - 6 May 1922 (Mumbai)
* कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले.
* 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
* 1891- श्रीमंत लक्ष्मीबाईसाहेब यांच्याशी विवाह झाला
महाराजांचे शिक्षण - *1985 ते 1894 या काळात शैक्षणिक कार्य पूर्ण केले
*1894 सर फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड येथे शिक्षण घेतले
*1898 पर्यंत राजकोट येथे Principal McNoton यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले.
* 2 एप्रिल 1894 रोजी राज्याभिषेक समारंभ झाला.
*1894 - राजे झालेनंतर लगेचंच त्यांनी बहुजन समाजातून तलाठ्याच्या नेमणुका करण्याचा अध्यादेश काढला
व वेठबिगाराची पद्धत बंद केली.
* 1895 साली मोतीबाग तालीम सुरु केली. शाहू महाराजांना कुस्ती हा खेळ आवडत असे. याच वर्षी शाहूपुरी गुळाची व्यापार पेठ सुरु केली.
* 27 मार्च 1895 - पुणे येथील फर्गुसन महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले.
* 1887 - आळते महार स्कूल ची स्थापना केली, दुष्काळ पिडीत शेतकऱ्यांना कर्ज दिले.
* 1899 - वेदोक्त प्रकरण याच वर्षी घडले. तेंव्हापासून ब्राम्हणांच्या मक्तेदारीस शह देण्यासाठी आणि त्यांच्याकडून बहुजनांची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी बहुजन उद्धाराचे कार्य हाती घेतले. वेदोक्त प्रकरणात ब्राम्हणांचे समर्थन केले.
* 1901 साली मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग' या बोर्डिंग ची स्थापना कोल्हापुरात केली. याच वर्षी
नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना केली. तसेच गोवध बंदी कायदा केला.
* 20 जुलै 1902 रोजी संस्थानामध्ये नोकरी मध्ये 50% आरक्षण देण्याचा आदेश काढला.
* 9 नोव्हेंबर 1906 रोजी 'किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना कोल्हापूर येथे केली. तसेच शाहू मिल तथा 'शाहू स्पिनिंग अंण्ड विव्हिंग मिल' ची सुरुवात केली.
* 1907 सहकारी तत्वावर कापड गिरणी सुरु केली. अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी ' मिस क्लार्क बोर्डिंग हाउस ची' स्थापना केली.
* 1908 बॉंबस्फोट घडवून महाराजांना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न समाजकंटकांकडून केला गेला.
* 1910 जहागीरदारांचे अधिकार कमी केले
* 11 जानेवारी 1911 साली
कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अध्यक्ष म्हणून परशुराम घोसटवाडकर तर प्रमुख म्हणून भास्करराव जाधव हे काम पाहत. याच वर्षी विद्यार्थ्यांना 15% नादारी देण्याची घोषणा केली.
-शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याची योजना व गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याची योजना सुरु केली.
-कोल्हापुरात राधानगरी तालुक्यात भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले.
-सत्यशोधक समाजाचे अधिवेशन पुणे येथे भरवले
* 1912 - खासबाग मैदान या कुस्ती मैदानाची सुरुवात कोल्हापूर येथे केली. (याला 2012 साली 100 वर्षे पूर्ण झाली).
- सहकारी कायदा केला व सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले.
-सत्यशोधक समाजाचे अधिवेशन नाशिक येथे भरवले
*1913 गाव तिथे शाळा असावी असा अध्यादेश काढला. पाटील शाळांची सुरुवात केली.
-कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुरु केली.
* 1916 साली संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले
-बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी 'डेक्कन रयत शिक्षण संस्थे' ची स्थापना निपाणी या ठिकाणी केली.
-आर्य समाजाची तत्त्वे याच वर्षी स्वीकारली.
* 1917 विधवांच्या पुनर्विवाहास कायद्याने मान्यता दिली
- 25- जुलै पासून संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.
* 1918 आंतरजातीय विवाहास कायद्याने मान्यता दिली
- कुलकर्णी व महार वतने रद्द केली.
- जमिनी रयतवारीने कसण्यास दिल्या
- आर्य समाजाची शाखा कोल्हापुरात सुरु करून राजाराम कॉलेज या संस्थेकडे चालवण्यास दिले.
- गुन्हे गारी जमातीच्या लोकांची पोलीस हजेरी बंद केली.
- तलाठी शाळा सुरु केल्या.
* 1919 - स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यायांविरुद्ध कठोर कायदा केला.
- एप्रिल 1919 - कानपूर - "अखिल भारत वर्षीय कुर्मी क्षत्रिय महासभा" या संस्थेच्या 13 व्या
अधिवेशनात त्यांच्या अतुल्य कार्याबद्दल "राजर्षी" पदवी बहाल करण्यात आली.
- शाळेत अस्पृश्यता पाळण्यास मनाई करणारा कायदा केला.
* 1920 - घटस्फोटाचा कायदा करण्यात आला
- देवदाशी प्रथा कायद्याने बंद करण्यात आली
- हुबळी - "ब्राम्हणेतर सामाजिक परिषद" चे अध्यक्षपद भूषवले
- पूजाअर्चा शिकाऊ उमेदवाराकडून करावी असा आदेश काढला
* 6 मे 1922 रोजी मुंबई येथे निधन.

हिंदू-मुस्लिम माणुसकीचे दर्शन


हिंदू-मुस्लिम माणुसकीचे दर्शन

नक्की वाचा - हे फक्त आपल्या भारतातच होऊ शकते 


मुंबई च्या मालाड या मुस्लिमबहूल भागात 1 हिंदू विधवा महिला सखू किरणसिन्ह अनेक वर्षापासून एकटीच राहत होती. शुक्रवारी राहत्या घरी तिचे निधन झाले.आजूबाजूला मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने राहतात,तिच्या कुटुंबात कोणीच नव्हते.
जेंव्हा त्या परिसरातील मुस्लिम तरुणांना या घटनेची माहिती झाली तेंव्हा त्या मोहल्ल्यातील सर्वांनी मिळून हिंदू धर्माच्या परंपरेनुसार अंत्यविधीसाठी लागणार्‍या सर्व साहित्याचा बंदोबस्त केला. त्याच परिसरातील मुस्लिम तरुणांनी त्या हिंदू स्त्रीला खांदा देत सामाजिक एकतेचे आणि माणुसकीचे अनोखे दर्शन देऊन एक चांगला संदेश सर्व समाजाला दिला. सर्व लोकांनी साश्रूनयनांनी ओशिवरा येथील स्मशान भूमीमध्ये त्या महिलेचे अंत्यसंस्कार केले 

माणुसकीचे दर्शन घडवणार्‍या या गोष्टीसाठी एक जय हिंद झालाच पाहिजे 

Wednesday 22 June 2016

यालाच म्हणतात प्रेम व मानुसकी......


!!! खरच वाचा !!!




हि घटना आहे हैद्राबाद मधील अमिरपेठ शहरातील ज्या शहराच्या नावातच श्रीमंती आहे     तीथली ही घटना एकदा खरच वाचा..


काल रात्री जेवल्यानंतर सहज फिरुन यायच म्हणून आम्ही ३ मित्र बाहेर पडलो. थोड्या अंतरावर आल्यावर बघतो तर काय एक लहान मुलगा कदाचीत ५ ते ६ वयाचा असेल आधीच रात्र अन त्यात थोडा पाऊस पडल्यामुळे थंडी पण होती त्या परीस्थितीत हा मुलगा अंगाला सिल्व्हर कलर माखुन एक लहान मग घेउन बसला होता भिक मागण्यासाठी त्यावेळी त्याच्या अंगाला कलर माखण्या मागे एकच कारण होत ते म्हणजे रात्रीच्या वेळी तो सगळ्याना दिसावा व आकर्षिक होऊन येणार्या जाणाऱ्या लोकांनी त्याला पैसे द्यावे..हे सगळ चालु असताना त्याला एका मानसाने आंब्याचा जुस आनुन दिला पण तो मुलगा तो जुस नाकारत होता पण त्या मानसाने त्याच्याजवळ ठेवला अन निघुन गेला...थोड्या वेळाने त्या मुलग्या जवळ एक कुत्र्याच लहान पिलु आल अन त्याला ठेवलेल्या जुस कडे बघु लागल न प्रयत्न करु लागल जुस घेण्याचा त्यावेळी त्या लहान मुलग्याने चावेल म्हणून हात वर केला अन ते कुत्र त्याच्या मागे जाऊन बसल कारण हा मुलगा जुस पिउन झाल्यावर त्या ग्लास मधील राहीलेला आपल्या मिळु शकेल पण थोड्या वेळाने बगतो तर काय तोंड न लावलेला तो जुस चा ग्लास आहे तसा त्या कुत्र्याच्या पिलाला जाऊन दिला खरच डोळे भरुन येतात असे काही पाहीले की....यालाच म्हणतात प्रेम व मानुसकी


Tuesday 21 June 2016

त्यांना “स्तन” म्हणतात....


“तुझ्या आईला आणि बहिणीला पण आहेत असे सेम”...










जरूर वाचा आणि विचार करा,
समाजात आपलीही आई-बहीण वावरत असते याचे भान ठेऊन वागत जा

किळसवाण्या कित्येक नजरा....
“अरे बघ ना....! टमाटर आहेत” 
ऐन मिसरूड फुटलेल्या जेमतेम विशीतल्या पोरांच्या घोळक्यातुन हे वाक्य आल होत....
ठिकाण पी.एम.टी बस,
आताच २६–२७ वर्षाची,खांद्याला पत्रकारीता पद्धतीच दप्तर अडकवलेली उंच,गोऱ्या रंगाची आणि धिप्पाड बांध्याची मुलगी घाई घाईतच स्वतःला आणि स्वतःच्या ओढनीला सावरत पी.एम.टी बसच्या दरवाज्यातून आत बसमध्ये आली होती पण गाडीतल्या गर्दीमुळे ती मधेच घुटमळली असावी,मात्र तिच्याकडे पाहून उद्गारले गेलेल्या या वाक्यानंतर त्या घोळक्यातल एक डुकरी खिल्लड हसू संपूर्ण बसला ऐकायला भेटल.
बाकीच्यांना कदाचित काय झाल तेही कळाल नसेल मात्र सगळ्यांचे कान जरूर त्या उन्मदाकडे टवकारले गेले होते,
कंडक्टर काकांकडून तिकीट घेतल्यावर ती मुलगी क्षणार्धात त्या घोळक्याकडे वळाली...

आता पुढे काहीतरी वेगळ विपरीत होणार याची कुणकुण त्यातल्या प्रत्येकालाही लागली असेल कदाचित......
“का रे ? कुठे टमाटर दिसले तुला ? ” 
तिने त्या घोळक्यातल्या डुकराला बरोबर हेरल होत आणि म्हणून तिने त्यालाच बरोबर विचारल..... 
“जिथे दिसायला पाहीजे होते तिथेच दिसले ” त्याच्याकडून मुजोर प्रतिउत्तर आल,यानंतर त्या नालायकाची वागण्याची परीसीमा तिच्या पण लक्षात आली.
“अरे बाळा टमाटर नाहीत हे.....
तुझा गैरसमज झाला...
त्यांना “स्तन” म्हणतात.... 
“तुझ्या आईला आणि बहिणीला पण आहेत असे सेम”...हां.. कदाचित तू घरी ते तेवढे लक्ष देऊन पहिले नसशील.
जेव्हा तू लहान असशील ना....तेव्हा तर तुझ्या आईने काळजीने यातूनच तुला कित्येकदा दुध पाजून तुझी भूक भागवली असेल.... 
आणि काही नाही रे मांसल असतात....
तुझ्या हातापायांसारखे,
घरी गेल्यावर आईला किंवा बहिणीला विचार
सांगतील त्या,आणि हो आणि टमाटर नको म्हणूस नाहीतर त्यांना समजणार नाही....
“स्तन” म्हण....
स्त्रीयांना निसर्गाने दिलेली दैवी देणगी आहे ती,तुला नाही समजणार ते,कारण तुझ्यावर संस्कार करायला वेळच नसेल मिळाला तुझ्या घरच्यांना नाहीतर असा घाणेरडेपणा तुझ्या जिभेवर आलाच नसता.

त्याच्या अंगाला स्पर्शही न करता,तिने त्याला मारलेल्या त्या चपाराकीचा आवाज आता पी.एम.टी. बसच्या कानाकोपऱ्यात पोहचला होता,तिच्या डोळ्यातला निखारा आणि वागण्यातला आक्रमकपणा पाहून आणि काही वेगळ घडायच्या आधीच ४५-५० वर्ष्यांच्या एक मावशी तिला शांत करायला पुढे झाल्या, “शांत हो पोरी त्याला आता त्याची चूक उमगली असेल,तू नको आणि त्रास करून घेउस” हे सगळ समजावताना पण मावशी तिच्यापासून हातभर अंतर ठेउनच बोलतच होत्या.... 
“ काय शांत होऊ ओ काकू ?....किळस वाटतेय या लोकांची....२० वर्षांच नवीन मिशी फुटलेलं पोरग असू द्यात किंवा माझ्या वडिलांच्या वयाचे काका असुदेत,
तरी संपूर्ण अंगभर कपडे घातलेले असताना पण जेव्हा समोरचा कुणी मी त्याच्यासमोर नग्न उभी आहे या नजरेने पाहतो ना....तेव्हा मेल्याहून मरून जायला होत ओ..... 
“रोज रोज तेच....तीच वासानाधीन नजर...का रे ? का सहन करायचं आम्ही ते रोज ? घरून दमून थकून काम करून यायचं आणि प्रवासात प्रत्येक क्षणी ओढणी आणि पदर सावरायचा......का ? तर या पिसाळलेल्या लोकांच्या नजरा चुकवायला,
हे घरी आपल्या आई बहिणींकडे पण याच नजरेने पाहत असतील का ओ ? या तिच्या  प्रश्नार्थक वाक्यानंतर क्षणार्धात बसमधल्या सर्व पुरषी माना आपापल्या पायांच्या अंगठ्याकड़े झुकल्या....” 
तिच्या रागाचा पारा चढलेलाच होता आणि तेवढ्यात तिच्याच वयाची एक मुलगी आपल्या जागेवरून उठली,
७-८ पावल चालून आता ती त्या मुलांच्या घोळक्याच्या आणि त्या मुलीच्या मधोमध येउन उभी राहिली.
पुढच्याच क्षणी तिने त्या मुलाच्या जोरात कानाखाली वाजवली,त्याच्या थोबाडीत मारल्यानंतर तिचा वाढलेला श्वास आणि राग सहज जाणवत होता.ती तशीच मागे झाली आणि परत आपल्या जागेवर जाउन बसली.एव्हाना चालू प्रकार बसच्या ड्राईव्हर काकांनापण समजला होता,म्हणून त्यांनीही बस बाजूला उभी केली,आणि मग ह्या प्रकाराने डोळ्यात पाणी आलेली ती मुलगी पुन्हा बोलायला लागली....

अगदी घराच्या बाहेर पहिल पाऊल टाकल्या टाकल्या,समोरच्या टपरीवर उभ्या असलेल्या टोळक्यातून काहीतरी अश्लील कमेंट पास होते त्याकडे दुर्लक्ष करायचं,
पुढे रिक्षासाठी उभ असताना जाणाऱ्या येणाऱ्या कित्येक वासनाधीन नजरा झेलायच्या,
नंतर बसमध्ये चढताना नको ते हपापलेले स्पर्श झेलायचे,
आणि त्यानंतर जिथे काम करायचं तिथेही हेच....
नालायक कुत्रे सगळे.....
कधीतरी समोरच्या बाईकडे...आई म्हणून ताई म्हणून पहा रे....
तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू तिच्या मनातली व्यथा सहज सांगत होते.पुढे काही वेळाने बस सुरु झाली तरी नंतर बसमध्ये एकच निरव शांतता होती,तरी त्या शांततेत एक आक्रोश हंबरडा फोडतच होता......!!!!

एक नागरिक म्हणून जेव्हा मी या विषयावर लिहायचं ठरवल तेव्हा मी माझ्या जवळच्या बऱ्याच मैत्रिणींशी या अश्या किळसवाण्या नजराबद्दल चर्चा केली मात्र....
बहुतांश मुलींनी “आम्ही सरळ दुर्लक्षच करतो” या प्रकारच उत्तर दिल.
कदाचित यामुळेच असेल कि या घटनांमधल्या विकृत मनोवृत्तीच्या लोकांची हिंमत  वाढत असेल.वेळीच जर प्रत्येकीने अश्या लोकांना आईच्या दुधाची आठवण करून दिली तर नक्कीच अश्या अपप्रवृत्तींना वेळीच जरब बसेल.
शेवटी होणारा प्रकार रोजचाच झाल्यामुळे बहुतांश जणींनी तर....या विषयावर लिहूच नकोस.... “काही फायदा नाही” अश्या प्रतिक्रिया दिल्या....पण असो वाचणाऱ्या प्रत्येकाला,प्रत्येक मुलीला जर लिखाणाच गांभीर्य कळाल असेल तर नक्कीच आपल्या जवळच्या लोकांबरोबर हे शेअर करा.ह्या गोष्टी नजरेआड करण्यासारख्या नक्कीच नाहीयेत....वेळीच या अश्या विषयांना वाचा फोडली तरच काही अंशी तरी आपण गोष्ठी बदलवण्यात यशस्वी होऊ शकू......!!!!

म्हातारी


बस थांबली तसे सगळे प्रवासी आत चढले. म्हातारीनंही आपलं गाठोडं उचललं आणि ती बसमध्ये चढू लागली.
"ए म्हातारे , आत चढू नको. बसमध्ये जागा नाही." म्हातारीला बघताच कंडक्टर डाफरला.
"का रे बाबा, सगळ्यास्नी जागा आहे आणि मलाच जागा नाही होय ?"म्हातारी बोलली.
"तुझ्याकडं ओझं आहे म्हणून. ......कशाचं आहे ते गठुळं ?"
"वांगी हाईत."
"मग मागच्या बसनं ये. ही सीटी बस आहे. यातनं सामान नेता येत नाही."
"एवढं कुठं जास्त आहे ? ......तर नुसती एक बुट्टी तर आहे." म्हातारीनं एव्हाना वांग्याची बुट्टी बसमध्ये ढकलली होती. तीही वर चढली आणि दारासमोरच्या बाकड्यावर बसली.
"म्हातारे , तिकीट कुठलं देवू ?" कंडक्टरनं विचारलं.
"मार्केट दे बाबा एक."
"लगेजचं तिकीट पण घ्यावं लागेल."
"ते काय असतंय ?"
"हे तुझ्याजवळ गठुळं आहे की नाही त्याचंही तिकीट घ्यावं लागेल."
"एवढं एवढं तर हाय. त्याला रे कसलं तिकीट ?...का उगाचच छळायचं गरीबाला ?"
"तुला सामानाचं तिकीट तर काढावंच लागेल."
"काढ तर मग ! ..पण मी एक पैसाबी देणार नाही त्याचा."
इतक्यात बस थांबली. एक सैनिक आपल्या बायकापोरांसह आत शिरला. जवळ दोन मोठ्या बॅगा आणि तीन हात लांबीची एक ट्रंक .
"कंडक्टर , दोन दोन फुल्ल दोन हाफ, रेल्वे स्टेशन."
कंडक्टरनं तिकिटं फाडून दिली. 
"आता का लगेज फाडला नाहीस रे लेका ? ....का ट्रंकंला लगेज नसतंय ?" म्हातारी बोलली तशी बसमधली सगळी माणसं हसली. "घरात आया भनी आज्ज्या कोण नसल्यावाणी वागत्यात माणसं." म्हातारीनं पुढं म्हटलं आणि कंडक्टर तोंडात मारल्यासारखा गप्प बसला.
मार्केटचा स्टॉप आला. म्हातारी ओझं घेऊन खाली उतरली. 
ती मंडईत आली तेव्हा बाजार भरायला लागला होता. तिनं डोक्यावरचं गाठोडं खाली ठेवलं.ती एक कापड अंथरुन त्यावर वांगी पसरणाऱ इतक्यात ," ए म्हातारे , तिथं बसू नको ; ती जागा माझी आहे."असं कुणीतरी ओरडलं. म्हातारी मग पलीकडच्या बाजूला सरकली.तिथंही तसंच. व्यापारी लोक तिला तिथं बसूच देईनात.म्हातारी पुढं सरकत सरकत पार एका कोपऱ्यात गेली आणि तिथं टेकली.
तो कोपरा पार अडगळीत होता. कधीतरी एखादं गिर्हाइक त्या बाजूला फिरकायचं. बऱ्याच वेळानं एक तरूणी आली. 
"आज्जी , वांगी कशी दिली ?" तिनं विचारलं.
"दहा रुपये पावशेर."
"पाच रुपयानं देणार ?"
"एवढं स्वस्त देऊन कसं परवडेल बाळा ?"
"मग राहू दे." ती मुलगी तशीच दुकानात शिरली आणि दहा रुपयांचं चॉकलेट घेऊन गेली.
नंतर एक एक गिर्हाइक येवू लागलं आणि किलो , अर्धा किलो, पाव किलो वांगी घेऊन जाऊ लागलं. 
"मावशे , वांगी कशी ?" एका सुशिक्षित माणसानं गाडीवर बसूनच विचारलं."
"वीस रूपये अर्धा किलो." म्हातारी बोलली.
"एक किलो घेतो. निम्म्या दरानं देणार काय सांग !"
"गाडी नवी घेतलीस वाटतं लेकरा ?"
"होय ! कालच आणली."
"किती रूपयला ?"
"पंचावन्न हजारला."
"मग त्यांनी किती किंमत कमी केली ? का निम्म्या किंमतीतच आणलीस ?" तो माणूस काही बोलला नाही.गाडीला किक् मारून पळाला.
म्हातारीची वांगी विकून झाली तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. उन्हानं म्हातारीचं अंग भाजत होतं. तहानेनं तोंड कोरडं पडलं होतं. काल दिवसभर एकादशीचा उपास. सकाळी चहा घ्यायचा होता पण बस चुकली तर काय करायचं म्हणून ती तशीच घोटभर पाणी पिऊन आलेली. मघापासून तिला फिरवायला लागलेलं.
तिनं पैसे मोजले.नुसते दोनशे वीस रूपये. आता यात म्हाताऱ्याची बीपी ची औषधं , आठवड्याचं तेल मीठ , कसं काय बसवायचं ? विचार करत करत ती उठली आणि काय होतंय कळायच्या आतच खाली कोसळली.
अरे ,म्हातारी पडली ,म्हातारी पडली ; असा गलका झाला आणि लोक जमले.
"कशी काय पडली ?"
"उन्हाचा तडाखा बसला असेल."
"सकाळपासून काही खाल्लं नसेल त्यामुळं साखर कमी झाली असेल."
"कुणी सांगावं तंबाखू पण लागली असेल."
सतरा जणांची सतरा तोंडं !
कुणी तिच्या नाकाला कांदा लावला , कुणी पाणी मारलं तर कुणी वारा घातला.
घटकाभरानं म्हातारी शुद्धीवर आली.
"म्हातारे ,सकाळपासून काय खाल्लंय का ?" कुणीतरी विचारलं. म्हातारीनं नकारार्थी मान हलवली.
"चल , मग काय तरी खाऊन घे...नाहीतर कोम्यात जाशील." 
दोघातिघांनी तिला समोरच्या हॉटेलात नेलं. आत गेल्यावर ती तिथंच खाली फरशीवर बसली.
" आज्जी , वर बसा की !"वेटर बोलला.
"असूदे हितंच ."
"काय खाणार ?"
"काय हाय ?"
" बैंगन मसाला आणि रोटी देवू ?"
"ते काय असतंय ?"
"वांग्याची भाजी आणि रोटी !"
"चालंल." म्हातारी बोलली.
"तोपर्यंत एक लस्सीबिस्सी द्यारे एक.नाहीतर तुमचं जेवण येईपर्यंत म्हातारी पुन्हा एकदा चक्कर येऊन पडायची ." बरोबर आलेला माणूस बोलला आणि निघून गेला.
म्हातारीचं जेवण झालं.
"आज्जी , भात देऊ ?" वेटरनं विचारलं.
"नको.....पैसं किती झालं ?"
"एकशे ऐंशी रूपये."
"किती ?"
"एकशे ऐंशी रूपये.....साठ रुपयांच्या दोन रोट्या , नव्वद रुपयांचा बैंगन मसाला आणि तीस रुपयांची लस्सी."
"एवढं पैसं एका जेवणाला ?"

यष्टीचं जाण्यायेण्याचं चाळीस रुपये आणि जेवणाचं एकशे ऐंशी.... दोनशे वीस रुपये झाले.
म्हातारी हिशेब लावत होती...
चार महिन्यापुर्वी वांग्याची झाडं लावली, चार महीने त्यांची निगा राखली. कालपासुन वांगी तोडली, आणली, बाज़ारात आणुन विकली. एवढं सगळ करुन पाटीभर वांग्याचे दोनशे विस रुपये....? आणि एका जेवणाचे पण दोनशे विस रुपये....?
मग कालपासुन जीवाचा एवढा आटापीटा केला तो कशासाठी..? नुसत्या एका जेवणासाठी..? आता आठवडाभर काय करायचं..? तेल मिठ कुठनं आणायचं..? आणि म्हाता-याच्या औषधाच काय..?
विचार करुन म्हातारीला पुन्हा चक्कर आली आणि ती भुईवर कोसळली..... कोसळली ती कायमचीच.....!
माफ करा शेतिविषयक नाही....
पण चिंतन करायला लावणारी आहे.....
रहावल नाही म्हणुन पाठवलं ..... वस्तू घेताना समोर कोन आहे, याचा विचार नक्कीच करावा...व्यापारी व परिस्थितीशी लढणारी म्हातारी यातील फरक ओळखावा....

Tuesday 14 June 2016

विश्व रक्तदान दिवस


विश्व रक्तदान दिवस 14 जून को घोषित किया गया है। विश्व स्वास्थ्य संगठन द्वारा हर साल 14 जून को 'रक्तदान दिवस' मनाया जाता है। वर्ष 1997 में विश्व स्वास्थ्य संगठन ने 100 फीसदी स्वैच्छिक रक्तदान नीति की नींव डाली है। वर्ष 1997 में संगठन ने यह लक्ष्य रखा था कि विश्व के प्रमुख 124 देश अपने यहाँ स्वैच्छिक रक्तदान को ही बढ़ावा दें। मक़सद यह था कि रक्त की जरूरत पड़ने पर उसके लिए पैसे देने की जरूरत नहीं पड़नी चाहिए, पर अब तक लगभग 49 देशों ने ही इस पर अमल किया है। तंजानिया जैसे देश में 80 प्रतिशत रक्तदाता पैसे नहीं लेते, कई देशों जिनमें भारत भी शामिल है, रक्तदाता पैसे लेता है। ब्राजील में तो यह क़ानून है कि आप रक्तदान के पश्चात किसी भी प्रकार की सहायता नहीं ले सकते। ऑस्ट्रेलिया के साथ साथ कुछ अन्य देश भी हैं जहाँ पर रक्तदाता पैसे बिलकुल भी नहीं लेते।

14 जून ही क्यों ?

बहुत कम लोग जानते हैं कि विश्व स्वास्थ्य संगठन ने रक्तदान को बढ़ावा देने के लिए 14 जून को ही विश्व रक्तदाता दिवस के तौर पर क्यों चुना ! दरअसल कार्ल लेण्डस्टाइनर (जन्म- 14 जून 1868 - मृत्यु- 26 जून 1943) नामक अपने समय के विख्यात ऑस्ट्रियाई जीवविज्ञानी और भौतिकीविद की याद में उनके जन्मदिन के अवसर पर दिन तय किया गया है। वर्ष 1930 में शरीर विज्ञान में नोबेल पुरस्कार से सम्मानित उपरोक्त मनीषि को यह श्रेय जाता है कि उन्होंने रक्त में अग्गुल्युटिनिन की मौजूदगी के आधार पर रक्त का अलग अलग रक्त समूहों - ए, बी, ओ में वर्गीकरण कर चिकित्साविज्ञान में अहम योगदान दिया।

भारत में रक्तदान की स्थिति

विश्व स्वास्थ्य संगठन के मानक के तहत भारत में सालाना एक करोड़ यूनिट रक्त की जरूरत है लेकिन उपलब्ध 75 लाख यूनिट ही हो पाता है। यानी क़रीब 25 लाख यूनिट रक्त के अभाव में हर साल सैंकड़ों मरीज़ दम तोड़ देते हैं। राजधानी दिल्ली में आंकड़ों के मुताबिक यहां हर साल 350 लाख रक्त यूनिट की आवश्यकता रहती है, लेकिन स्वैच्छिक रक्तदाताओं से इसका महज 30 फीसदी ही जुट पाता है। जो हाल दिल्ली का है वही शेष भारत का है। यह अकारण नहीं कि भारत की आबादी भले ही सवा अरब पहुंच गयी हो, रक्तदाताओं का आंकड़ा कुल आबादी का एक प्रतिशत भी नहीं पहुंच पाया है। विशेषज्ञों के अनुसार भारत में कुल रक्तदान का केवल 59 फीसदी रक्तदान स्वेच्छिक होता है। जबकि राजधानी दिल्ली में तो स्वैच्छिक रक्तदान केवल 32 फीसदी है। दिल्ली में 53 ब्लड बैंक हैं पर फिर भी एक लाख यूनिट रक्त की कमी है। वहीं तीसरी दुनिया के कई सारे देश हैं जो इस मामले में भारत को काफ़ी पीछा छोड़ देते हैं। मालूम हो हाल में राजशाही के जोखड़ से मुक्त होकर गणतंत्र बने नेपाल में कुल रक्त की जरूरत का 90 फीसदी स्वैच्छिक रक्तदान से पूरा होता है तो श्रीलंका में 60 फीसदी, थाईलेण्ड में 95 फीसदी, इण्डोनेशिया में 77 फीसदी और अपनी निरंकुश हुकूमत के लिए चर्चित बर्मा में 60 फीसदी हिस्सा रक्तदान से पूरा होता है।[2]

रक्तदान को लेकर विभिन्न भ्रांतियाँ

रक्त की महिमा सभी जानते हैं। रक्त से आपकी ज़िंदगी तो चलती ही है साथ ही कितने अन्य के जीवन को भी बचाया जा सकता है। दुनिया के इस सबसे बड़े लोकतंत्र भारत में अभी भी बहुत से लोग यह समझते हैं कि रक्तदान से शरीर कमज़ोर हो जाता है और उस रक्त की भरपाई होने में महिनों लग जाते हैं। इतना ही नहीं यह ग़लतफहमी भी व्याप्त है कि नियमित रक्त देने से लोगों की रोगप्रतिकारक क्षमता कम होती है और उसे बीमारियां जल्दी जकड़ लेती हैं। यहाँ भ्रम इस क़दर फैला हुआ है कि लोग रक्तदान का नाम सुनकर ही सिहर उठते हैं। भला बताइए क्या इससे पर्याप्त मात्रा में रक्त की उपलब्धता सुनिश्चित की जा सकती है?
विश्व रक्तदान दिवस समाज में रक्तदान को लेकर व्याप्त भ्रांति को दूर करने का और रक्तदान को प्रोत्साहित करने का काम करता है। भारतीय रेडक्रास के राष्ट्रीय मुख्यालय के ब्लड बैंक की निदेशक डॉ. वनश्री सिंह के अनुसार देश में रक्तदान को लेकर भ्रांतियाँ कम हुई हैं पर अब भी काफ़ी कुछ किया जाना बाकी है।

रक्तदान के सम्बन्ध में चिकित्सा विज्ञान


  • आमजन को यह पता होना चाहिए कि मनुष्य के शरीर में रक्त बनने की प्रक्रिया हमेशा चलती रहती है और रक्तदान से कोई भी नुकसान नहीं होता बल्कि यह तो बहुत ही कल्याणकारी कार्य है जिसे जब भी अवसर मिले संपन्न करना ही चाहिए।
  • रक्तदान के सम्बन्ध में चिकित्सा विज्ञान कहता है, कोई भी स्वस्थ्य व्यक्ति जिसकी उम्र 16 से 60 साल के बीच हो, जो 45 किलोग्राम से अधिक वजन का हो और जिसे जो एचआईवी, हेपाटिटिस बी या हेपाटिटिस सी जैसी बीमारी न हुई हो, वह रक्तदान कर सकता है।
  • एक बार में जो 350 मिलीग्राम रक्त दिया जाता है, उसकी पूर्ति शरीर में चौबीस घण्टे के अन्दर हो जाती है और गुणवत्ता की पूर्ति 21 दिनों के भीतर हो जाती है। दूसरे, जो व्यक्ति नियमित रक्तदान करते हैं उन्हें हृदय सम्बन्धी बीमारियां कम परेशान करती हैं।
  • तीसरी अहम बात यह है कि हमारे रक्त की संरचना ऐसी है कि उसमें समाहित रेड ब्लड सेल तीन माह में स्वयं ही मर जाते हैं, लिहाज़ा प्रत्येक स्वस्थ्य व्यक्ति तीन माह में एक बार रक्तदान कर सकता है। जानकारों के मुताबिक आधा लीटर रक्त तीन लोगों की जान बचा सकता है।
  • चिकित्सकों के मुताबिक रक्त का लम्बे समय तक भण्डारण नहीं किया जा सकता है।

पेशेवर रक्तदानकर्ता

आज ब्लड बैंकों में कई पेशेवर डोनर्स जब-तब रक्त बेचते हैं। तमाम शराबी, ड्रगिस्ट अपनी लत की भूख मिटाने के लिए थोड़े से पैसे की खातिर कई-कई बार रक्त बेचते हैं। इनमें से अधिकांश गंभीर रोगों से भी ग्रस्त होते है। अब ऐसा रक्त किसी को चढ़ा दिया जाए तो स्वाभाविक है कि वह बचने की बजाय बेमौत मारा जाएगा। लेकिन होता ऐसा ही है। आज भीदिल्लीमुंबई सहित कई बड़े शहरों में ऐसे रक्तदाता मिल जाएँगे जो कि चंद रुपयों के लिए अपना रक्त बेच देते हैं। इनमें से अधिकांश का रक्त दूषित होता है या उन्होंने दो चार दिन के भीतर ही रक्त दिया रहता है। जरूरत पड़ने पर व्यक्ति इनसे रक्त तो ले लेता है, परंतु बाद में उसे इसके परिणाम भुगतने पड़ते हैं।

रक्तदान के लिए जागरूकता

           सभ्यता के विकास की दौड़ में मनुष्य भले ही कितना आगे निकल जाए, पर जरूरत पड़ने पर आज भी एक मनुष्य दूसरे को अपना रक्त देने में हिचकिचाता है। रक्तदान के प्रति जागरूकता लाने की तमाम कोशिशों के बावजूद मनुष्य को मनुष्य का रक्त ख़रीदना ही पड़ता है। इससे बड़ी विडंबना और क्या हो सकती है कि कई दुर्घटनाओं में रक्त की समय पर आपूर्ति न होने के कारण लोग असमय मौत के मुँह में चले जाते हैं। रक्तदान के प्रति जागरूकता जिस स्तर पर लाई जाना चाहिए थी, उस स्तर पर न तो कोशिश हुई और न लोग जागरूक हुए। भारत की बात की जाए तो अब तक देश में एक भी केंद्रीयकृत रक्त बैंक की स्थापना नहीं हो सकी है जिसके माध्यम से पूरे देश में कहीं पर भी रक्त की जरूरत को पूरा किया जा सके। टेक्नोलॉजी में हुए विकास के बाद निजी तौर पर वेबसाइट्स के माध्यम से ब्लड बैंक व स्वैच्छिक रक्तदाताओं की सूची को बनाने का कार्य आरंभ हुआ। इसमें थोड़ी-बहुत सफलता भी मिली, लेकिन संतोषजनक हालात अभी नहीं बने।
डॉ. वनश्री कहती हैं कि रेडक्रास में 85 फीसदी रक्तदान स्वैच्छिक होता है और इसे 95 फीसदी तक करने की कार्ययोजना है। सरकार और विभिन्न संगठनों को ब्लड कैंप और मोबाइल कैंप लगा कर लोगों को रक्तदान के लिए प्रेरित करना चाहिए। लोगों को बताना होगा कि रक्तदान का कोई भी दुष्प्रभाव नहीं बल्कि यह आपको लोगों की जान बचाने वाला सुपरहीरो बनाता है। जागरुक लोगों को इस दिशा में सोचना होगा कि कैसे देश की अधिकांश आबादी को रक्तदान की महिमा समझाई जाए ताकि वे वक्त-हालात को समझ सकें और जब भी जरूरत हो इस परोपकारी कृत्य से पीछे ना हटें।
एड्स के बाद जागरूकता -- अस्सी के दशक के बाद रक्तदान करते समय काफ़ी सावधानी बरती जाने लगी है। रक्तदाता भी खुद यह जानकारी लेता है कि क्या रक्तदान के दौरान सही तरीके के चिकित्सकीय उपकरण प्रयोग किए जा रहे हैं। वैसे एड्स के कारण जहाँ जागरूकता बढ़ी, वहीं आम रक्तदाता के मन में भय भी बैठा है। इससे भी रक्तदान के प्रति उत्साह में कमी आई। इसका फ़ायदा कई ऐसे लोगों ने उठाया जिनका काम ही रक्त बेचना है।